Ad will apear here
Next
‘सुशिं’च्या विलोभनीय ‘रूपमती’चे आता श्रवणीय गारुड
ऑडिओबुकचे मंगळवारी रसिकार्पण
पुणे : वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ३५ वर्षांपूर्वी साकारलेल्या ‘रूपमती’ या कादंबरीची श्राव्य आवृत्ती स्टोरीटेल या आघाडीच्या ऑडिओबुक सेवेमध्ये दाखल होत आहे. ३५ वर्षांपूर्वी आलेल्या या अजरामर साहित्यकृतीच्या श्राव्य आवृत्तीचे रसिकार्पण ‘स्टोरीटेल हॅपी लिसनिंग’ या उपक्रमांर्गत मंगळवारी, चार जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. 

प्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी यांच्या आवाजात साकारलेल्या या कलाकृतीची झलक त्यांच्याच आवाज ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व मोफत आहे.  

नवी पेठ येथील पत्रकार भवनातील सभागृहामध्ये मंगळवारी, दुपारी तीन वाजता आयोजित या कार्यक्रमात ‘सुशि वाचक परिवारा’चा विशेष सहभाग असणार आहे. स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख व्यवस्थापक योगेश दशरथ, सुगंधा सुहास शिरवळकर यांचीही या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. 

‘रूपमती’ ही ऐतिहासिक कादंबरी सुहास शिरवळकरांच्या साहित्यसंपदेतील एक मानाचे पान आहे. ती ऐकणे हा देखील साहित्यरसिकांसाठी एक विलक्षण अनुभव ठरावा, या उद्देशाने ‘स्टोरीटेल’ ने प्रसिद्ध कलाकार तुषार दळवींच्या आवाजात ती रसिकांपुढे आणली आहे. यानिमित्ताने सुशिंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांचे हे अजरामर कार्य रसिकांपुढे श्राव्य माध्यमातून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रसिकांना ‘रुपमती’मधील निवडक प्रसंगाचे अभिवाचन प्रत्यक्ष तुषार दळवींकडून ऐकण्याची तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. याचा रसिकांनी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन ‘स्टोरीटेल’ व ‘सुशि वाचक परिवारा’च्या वतीने करण्यात आले आहे. 

सुहास शिरवळकर
तरुणाईशी जुळणारा एक अदृश्य धागा सुहास शिरवळकरांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तरुणाईच्या हृदयावर वर्षोंनुवर्षें राज्य करणाऱ्या ‘दुनियादारी’ लिहिणाऱ्या सु.शिं.ची एक नाजूक, हृदयस्पर्शी, भावपूर्ण अशी ऐतिहासिक कादंबरी म्हणजे ‘रूपमती’. 

‘बाजबहाद्दर-रूपमती’ची या प्रेमकहाणीच्या प्रकाशनास यंदा ३५ वर्षें पूर्ण होत आहेत. इतक्या कालावधीनंतरही तितकीच दिलखेचक आणि टवटवीत असलेली ही कादंबरी आता ‘स्टोरीटेल’ने ‘ऑडिओबुक’च्या स्वरुपात जगभरातील रसिकांसाठी सादर केली आहे. अत्यंत परिश्रम घेऊन, प्रत्यक्ष संशोधन करून शिरवळकरांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. एकाहून एक सुरेख अशी शेरोशायरी अन् साहित्यसौंदर्याचे दर्शन घडवणाऱ्या शिरवळकरांच्या आगळ्या शैलीची साक्ष देणारी ‘रूपमती’ श्राव्यरुपातून रसिकांच्या आणखीच जवळ येणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZZFCB
Similar Posts
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
‘महाभारत हे केवळ धर्मयुद्ध नव्हते’ : डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांची विशेष मुलाखत आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले पुण्यातील ज्येष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे १९ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. (जन्मतारीख : १४ फेब्रुवारी १९१८) संस्कृत भाषा, ऋग्वेद, महाभारत, निरुक्ता, तसेच पाली, प्राकृत भाषेतील संशोधन आणि अवेस्ता या पारशी ग्रंथाचे संशोधन अशा विविध विषयांत डॉ
ऐका हो ऐका... साध्या फोनवर दिवाळी अंक मोफत ऐका; ‘छात्र प्रबोधन’चा मुलांसाठी उपक्रम दैनंदिन शिक्षणातच जिथे इतक्या अडचणी येतायत, तिथे दिवाळी अंक घेऊन वाचण्याची गोष्टच दूर. या पार्श्वभूमीवर, पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या ‘छात्र प्रबोधन’ या कुमारांसाठीच्या मासिकाने यंदा दिवाळी अंक फोनवर मोफत ऐकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी स्मार्टफोन लागणार नाही आणि इंटरनेटचीही गरज नाही
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language